श्री गणेशदत्तगुरूभ्यो नम :
श्रीरामगुरू चरित्र
॥ अध्याय 36 वा ॥
। श्री गणेशाय नम: ।श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरूभ्यो नम: ।गुरू दत्तात्रय त्रयमुर्ति । सर्वसाक्षात विभूती । पूर्णब्रम्हरूपजगती ।श्रीरामचंद्र सरस्वती ॥1॥ परमपुरूष अविनाशा । पुरवी अंतरीची आशा । त्रिगुणातीत परमेशा । त्रयमुर्तिदयाळा ॥2॥ साक्षरूपाने कलियुगी । अवतरले हे दत्तयोगी । त्रिभुवनी जागृत दत्तयती । शरणांगता रक्षिती ॥3॥ पवित्रजागृत हे मूळपी= । अत्रिॠषींचे पवित्र कूळ । तीर्थप्रोक्षणे प्रत्यक्षरिती । दत्तयोगी प्रगटले ॥4॥ धन्य पतिव्रता महासती । उध्दारली ही धरती । बाळे होवुनी त्रयमुर्ति । गुरूपी= चालविले ॥5॥समुद्रमंथनाचे वेळी । देतअसुरांचे कलहवेळी ।हालाहल निघाले प्रज्वळी । ते शंकर प्राशियले ॥6॥ हलाहल विष प्राशन करिता । नीलकं= तो झाला देखा । स्वयेस्वयंभू विश्वेश्वर । विष पचन केले असे ॥7॥ पुन्हा झाले समुद्रमंथन । अमृतज्ञाुंच्भ दिधला दान । ते वेळी दैत्यांनी । पुन्हाकलहमांडला ॥8॥ ज्ञाुंच्भ घेवुनी हातात । पळत निघले असूर दैत्य । पूर्ण ज्ञाुंच्भातील अमृत । अवनीवरी सांडले ॥9॥ तेवेळी नभांगणात । जी का नक्षत्र युती होत । अवनीच्चा कालभ्रमणात । एकशे चव्वेचाळीस वर्ष उपरांत ॥10॥ऐशा या पर्वसमयी । गंगामातेची नवलाई । सोडुनी आपला प्रवाह पाही । जागा आश्रया देई ॥12॥ दहादहा मैलांपर्यत।प्रांगणनिमळकरूनीदेत।ॠषीमुनींचे आश्रम तेथ । प्रस्थापित होताती ॥13॥ चहूभागतून ॠषीमुनी । यज्ञयागअनुष्ठनी । तपाचरण नामस्मरणी । व्रतस्थ तेथे राहताती ॥14॥ त्या स्थळीच्चा वास्तव्यास । म्हणताती कल्पवास ।त्रिकालस्नान गंगेत । आराध्य दैवत उपासिती ॥15॥ आपआपल्या ग्रंथातील लीला । गाती किर्तनी वेळोवेळा ।भक्तांचा पाहुनी सोहळा । प्रसन्नता वाटे घननिळा ॥16॥ गंगास्नानाचे महिमान । थोर किती असे जाणा । अवतारीपूरूष तीर्थस्नानी । प्रात:काळी जाताती ॥17॥ पवित्र ते गंगाजळ । सत्पुरूषांचे स्पर्शे निर्मळ । तदनंतर ते गंगाजळ ।जनसमूह स्पर्शिती ॥18॥ या पर्वकाळ समयाला । मौनी अमावस्येची वेळा । पवित्रता पर्वकाळा । पुण्यकर्म करिताती ॥19॥ ऐशा हया पर्वकाळी । सदगुरूनाथ चंद्रमोळी । भक्तासमवेत गंगाजळी । पर्वकाळी पातले ॥20॥ नक्षत्रयुतीचीहोता वेळ गगनमंडळी कल्लोळ । गरूडासनी विष्णुदेव । लक्ष्मीसह नभोमंडळी ॥21॥ भूतलवासी जनलोकी ।सतपुरूषांची दिव्यदृष्टी । होता ती अमृतवृष्टी । साक्षात विष्णुदेवांची भेटी ॥22॥ धन्य धन्य ते मानव । नयनी देखिलेविष्णुदेव । अंतरीचे सात्विकभाव । जागृत झाले तयेवेळी ॥23॥ ऐसे पर्वकाळाचे महत्व ।जीवनी मानव कृतार्थ ।वेदशास्त्र पुराणात । तीर्थमहिमा श्रेष्= असे ॥24॥ म्हणुनी थोर ॠषीमुनी । तीर्थस्नानाची पर्वणी । वेळोवेळी पवित्रस्थानी। स्नान संध्यार्चन करिताती ॥25॥ कलियुगातील कालक्रमणा । न घडे काही उपासना । जीवाचा करण्या उध्दार जाणा । सदगुरूशी शरण जावे॥26॥सदगुरूंचेचरणतीर्थ । तेचि शिष्या गंगा पवित्र । गुरूआज्ञेचे पालन नित्य । हेची अध्ययनलियुगी ॥27॥नकोजाउरानीवनी । गिरीकंदरी घोरांगणी । सुखी राहूनी आपुल्या सदनी । गुरूभजनीकाल क्रमी ॥28॥ अनंतरूपे अनंतनामे । चराचरी जागृतपणे । हरी नटला भिन्नरूपाने । स्मरण त्याचे नित्य =ेवी॥29॥ नामरूपाचे अधिष्ठन । सगुणरूपाचे अनुसंधान । नामस्मरणी नित्य राहून । कालक्रमणा सुखे करी ॥30॥ नामेतारीले पाषाण । नामे उध्दरीले पापीजन । नामसंकिर्तनात राहून । भवसागर पार करी ॥31॥ कलियुगी धर्मलोप ।पापपुण्या नाही माप । जनलोकी नाही शांत । कलहद्वेषी लोकास ॥32॥ प्राधन्य बहुवाढले । धनधान्या नाही वृध्दी। सदभावनांची लोपवृध्दी । नाही शांती मनुष्यजीवा ॥33॥ धगधगीत कालक्रमणा । गुप्त राहूनी गुरूराणा । जगदोध्दारकरण्या जाणा । अवतरले त्रयमुर्ति ॥34॥ त्रयमुर्तिचे रूप सगुण । एकचि तो परिपूर्ण । निर्विकार राहूनि । शरणांगतारक्षिती ॥35॥ यापुढील अध्यायी । विभूति महात्म्य नवलाई । सदगुरूंची किमया पाही ।श्रोते सज्जनी परिसावी॥36॥ गुरूवचनी श्रध्दायुक्त । जे का राहती निवन्त । तया मानवी जीवनात । काय उणे कलियुगी ॥37॥ भक्तरक्षणार्थकलियुगी । अवतरले हे दत्तयोगी । गुप्त राहूनी कलियुगी । नित्य रक्षिती भक्तजना ॥38॥ इति श्रीरामगुरूचरित्र ।परिसा रसाळ इक्षुदंड । विनवी दासी अखंड ।षड त्रिंशा ध्याय गोड हा ॥37 ॥
॥श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥अ व धू त चिं त न श्री गु रू दे व द त्त ॥
मागील पान पुढील पान |