अनुभव 4
दिनांक 31-12-84 रोजी सकाळी माझी प्रकृती बिघडली. मला अंदाज आला नाही. पण 10॥ वाजता एका एकी मला खुप चक्कर आले. 11 वाजता डॉक्टर आले. डॉक्टरांनी तपासले. रक्तदाब 270-180 पर्यंत वाढला. दोन वेळा ओका.या झाल्या (भरपुर) हिरवे पाणी पडले. डॉक्टरांनी दवाखान्यात भरती करावयास सांगीतले (मुसलमानी) इदेची सुटी असल्यामुळे ऍंब्युलन्स लवकर मिळाली नाही. 1 वाजता हॉस्पीटल मध्ये भरती केले. तेथे सर्व उपचार सुरु झाले. डॉक्टरांनी 36 तास कठीण आहेत सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या असे सांगितले. 36 तासानंतर थेंडा आराम पडला. पण अर्धांग वायु किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका आहे असे डॉक्टरांनी सांगितले. दुस.या दिवशी प. पू. महाराजांना समजले ते दवाखान्यात आले थोडा वेळ माझ्या जवळ असले आणि म्हणाले 36 तास प. पु. न/सिंह सरस्वती स्वामी महाराजांना येथे थांबवावे लागले. तुम्ही केलेली सेवा कामास आली. आता संकट टळले आहे. आता धोका नाही महाराजांनी अंगारा (विभूती) पाटविला व रोज दोन वेळा पाण्याबरोबर घ्यायला सांगितला. 11 दिवस दवाखान्यात काढले नंतर घरी आणले. गुरुमाऊलीच्या कृ पेने 2 महिन्यात प्रकृती पूर्ववत झाली. अर्धांग वायु किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका गुरुमाऊलीच्या कृ पेने टळला. अशी आमची पूर्ण श्रध्दा आहे. दांकट टळले ते गुरु कृ पेनेच. जशी माझ्यावर कृपा केली तशी सर्व शिष्यांवर करावी ही प्रार्थना.
|