|
अनुभव 2 दिवाळी - शिमगा इंदूरच्या एका अति धनाढय ग/हस्थाने एक मुलगा दत्तक घेतला. तो चांगला नीट वागेना. रोज भांडणे होत. ते ग/हस्थ खूप नाराज झाले मुला कडून होणारा त्रास असहय झाला. त्या ग/हस्थाने दत्तक विधान रद्य करुन घेण्यासाठी कोर्टात दावा टाकला. तारखा चालू होत्या. प्रकरण त्या ग/हस्थाच्या विरोधात जाण्याची चिन्हे दिसूं लागली. वकील फी मोठया रकमा घेऊनही नामांकित वकिलांना जिंकण्याची खात्री वाटेना. त्या ग/हस्थाला कोणीतरी सल्ला दिला. ते अकोल्याला आले. रामभाऊ महाराजांचे दर्शन घेतले. दागळे दु ख कथन केले. रामभाऊच्या तीन गुरुवारी इंदूरहून आले. निकालाची तारीख आली. निकाल आपल्या बाजूने लागणार नाही असे वकिलांनी खात्रीपूर्वक सांगितले. तसे झाले तर तो नालायक मुलगा करोडोच्या संपत्तीचा मालक झाला असता. ते ग/हस्थ ताबडतोब गाडी घेऊन महाराजाकडे आले.तोंडातून शब्द निघेना. डोळयातील अश्रू थांबेनात रडूनरडून आकांत केला आणि म्हणाले मला आता जीव देण्याशिवाय गत्यंतर नाही. श्री. रामदत्तांनी थोडा वेळ ध्यान केले आणि म्हणालेए शट्ठतकडे दिवाळी साजरी होत आहे आणि इकडे तुम्ही शिमगा साजरा करीत आहात जाए ताबडतोब परत जाट ते ग/हस्थ परत गेले. निकाल त्यांचया बाजूने लागाला होता आणि त्या मुलाला केलेल्या गुन्हयासाठी पोनिसांनी अटक केली होती. आनंदी आनंद झाला. त्या ग/हस्थाने अक्षरश: हजारो रुपयांच्या भेटवस्तू आणि द्रव्य रामभाऊस अर्पण करण्यासाठी आणले. पण रामभाऊंनी त्यांना घरात सुध्दा येऊ दिले नाही. एखाद्या मंदिराला किंवा धार्मिक संस्थेला ते सर्व दान करा असे सांगून त्यांना परत जाण्यास भाग पाडले. मात्र त्या साहित्यातील चंदनाच्या लाकडी खडावा रामभाऊंनी ठेवून घेतल्या. त्या खडावा आजही देव्हा.यात आहेत आणि आजही रामभाऊ दररोज पूजा करतांना इतर देवांबरोबर त्या खडावांची पूजा करण्यास कधीही विसरत नाहीत.
|
|