|
तीर्थयात्रा व अनुभूति
श्री क्षेत्र रिध्दपूर यात्रा रिध्दपूर यात्रेचा विचार बरेच दिवसाचा होता. पण कांहीना कांही कारणाने कल्पना साकार रूप घेत नव्हती. यज्ञ झाला त्याच वेळी निघायचेच होते पण योग नव्हता. खर म्हणजे महाराजांचे चरणीचे सेवा पूर्ण झाली नव्हती म्हणूनच त्याचे तिथे पोचायला परवानगी दिली नसेल काय? प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो म्हणतात ना! मग हया यात्रेला तरी त्या मुहूर्ताशिवाय महाराजांनी परवानगी कां द्यावी? दुसरं म्हणजे ही कांही पदयात्रा नव्हती. त्यामुळे निघायला आवश्यक असलेली तयारी महाराजांनी आधी करून घेतली असेलच मगच श्री वैद्यराज मुळे यांना निमित्त मात्र दिसायला महाराजांनी अकोल्यास पाठवलं दुसरे वैद्यराज श्री रंगनाथराव मुळे आले. अलभ्य लाभ झाला! पण या वेळचं श्री मुळ च येणं नेहमी सारखं वाटलं नाही. कांही तरी निश्चयान ते आले आहेत असं वाटत होतं, आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी सरळच प्रश्न केला '' बरीच वाट पाहिली पण आपलं येणं का, झालं नाही? '' ''यायचं आहे! जमलं की येतोच'' म्हणून उत्तर दिलं. पण त्यांच समाधान झाल नाही. ''आता यायलाच पाहिजे, टाळाटाळ करू नका'' पुन्हा श्री मुळे उदगारले! आणि आता चलाच म्हणून आग्रहयुक्त अधिकाराने त्यांनी सांगितले. त्यांनी हे वाक्य उच्चारलं आणि मनानी उचल खाल्ली की चला, गेलचं पाहिजे. कदाचित तया ठिकाणचं दर्शन घेण्याकरता आवश्यक असलेली पात्रता आता पूर्ण झाली आहे अस स्वामींना वाटलं असेल म्हणूनच सर्व गोष्टीची सिध्दता महाराजांनी घरात करून घेऊनच मनाची उत्सुकता वाढविली ही गोष्ट निश्चित! श्री जगन्माता एकविरा देविची अमरपूर (अमरावती) आली. स्टेशन बाहेर श्री मुळे पुन्हा दत्त म्हणून स्वागतास तयारच! बस स्थानक गाठलं. चांदूर बाजाराचा रस्ता भरधाव वेगाने मागे टाकत मोटार धावत होती. अवघ्या उक तासात चांदूर बाजार गाठलं. रिध्दपूर मोटारला तास दीड तास होता. याचा विचार मनात येतो न येतो तोच एक ट्रक समोर उभा झाला. त्याचा ड्रायव्हर रितपूर - रितपूर म्हणून ओरडू लागला. अंतरीची मनाची ओढ जबर त्यामुळे त्या ट्रकची चोकशी करून सर्वजण आनंदाने ट्रकमध्ये विराजमान झाले. अगदी थोडया वेळात तयाचे श्री क्षेत रिध्दपूरच्या परिसरात प्रवेश केला आणि थेट श्री भाऊसाहेब देशपांडे यांच्या वाडयापर्यंत नेऊन सोडले. जुन्या पध्दतीचा मोठा वाडा. आजू बाजूला थोडी मोकळी जागा, थोडा रस्ता ओलांडून मोठया दरवाजातून आंत प्रवेश केला आणि आपण महाराजांचे चरणी येऊन पोचलो याचा आनंद ओसंडू लागला. सामानाची व्यवस्था केली आणि समोरच बसलेल्या सात्विक भाव असलेल्या धीर गंभीर श्री भाऊसाहेब देशपांडे यांना नमस्कार करून आम्ही अकोला निवासी आहोत याची वर्णी दिली व हातपाय धुवून सर्वजण दर्शनाचे स्थान शोधू लागलो.
|
|